इतिहास

thumb

महाराष्ट्रात वैभवशाली, संपन्न सांस्कॄतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडिचा जिल्हा म्हणजे जळगांव जिल्हा होय. जळगांव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा हा पर्वत असून सुर्यकन्या तापी नदीचा हा भूसंपन्न परिसर. यावल ते अंकलेश्वर महामार्गावर चोपडा ते यावल राज्य रस्त्याच्या चिंचोली किंनगावच्या पश्चिम दिशेला उत्तरेस आंडगाव फाटा आहे. या आंडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र अवघे 9 किलोमीटर वर आहे. या आंडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्राकडे जातांना 6 किलोमीटर वर श्री हनुमानाचे मंदिर आहे. श्री हनुमान मंदिरापर्यंतची सडक हि पक्की डांबराची आहे. श्री हनुमान मंदिराजवळ सुंदर पाझर तलाव आहे.

श्री हनुमान मंदिरापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र हे जवळपास ३ किलोमीटर वर आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हा 3 किलोमीटरचा कच्चा रस्ता संस्थेने बांधून घेतला आहे. त्यामुळे आता खाजगी वाहने ( टू व्हिलर, आटोरीक्षा, कार, जीप, टॅक्सी इ. ) थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात. जळगांव ते श्रीमनुदेवी मंदिर हे 35 कि. मी. आहे.

देवीचे उत्सव

दररोज मंदिरात भाविकांचा अखंड ओघ सुरूच असतो. दर्शनासाठी दररोज अंदाजे 500 ते 1000 लोक येत असतात. नुकताच पार पडलेल्या चैत्र शुद्ध अष्टमी यात्रोत्सवाचा मुहूर्त साधत तब्बल 15000 हून अधिक भाविकांनी श्रीमनुदेवीचे देवीचे दर्शन घेतले. प्रत्येक वर्षाच्या विशिष्ट दिवशी/तिथी ला देवीचे उत्सव साजरे होतात. नवचंडी महायज्ञाचे आयोजन केले जाते तसेच देवीचा यात्रोस्तव साजरा होतो. खालील विशिष्ट दिवस भाविकांना दर्शनासाठी योग्य आहे.